सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१२

ईश्वर प्रार्थना...

सप्रेम नमस्कार - आशीर्वाद विनंती विशेष,

आपल्या लहानपणी आपल्या आईने आपल्या बालमनावर चांगले संस्कार केलेले आहेत.  त्या कारणे आपले मन आणि अंतर्मनही सशक्त, सक्षम झालेले आहे.  जर आपल्या बालमनावर संस्कार झाले नसते तर मन, अंतर्मन दुबळे झाले असते.  चांगले विचार मनामध्ये कधीही आले नसते आणि आपला जीवन प्रवास भरकट गेला असता.  आज आपण आपल्या आयुष्यात या संस्कारामुळे स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभे आहोत असे मला वाटते.  आपल्या आयुष्यात आपल्याला दु:ख, त्रास, समस्या आणि संकटे यांच्याशी सामना करावा लागतो कमी अधिक प्रमाणात. हे सत्य नाकारता येणार नाही. दु:ख, त्रास, समस्या, संकटे यांच्याशी सामना करीत असतांना संस्कारक्षम मन शेवटी आपल्या परम पूज्य ईश्वरचरणी लीन होते.  संस्कारक्षम मनाला ईश्वराचा एकमेव आधार असतो.  अशा वेळी आपण या सर्वांवर मात करण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो.  आपला ईश्वरावर विश्वास असतो की दु:ख, त्रास, समस्या, संकटे आपला ईश्वर निश्चित कमी करील, दूर करील.  हा ईश्वरावरील विश्वास, आपण केलेली प्रार्थना फलद्रूप होऊन आपल्याला झालेले दु:ख, त्रास, उद्भवलेल्या समस्या आणि संकटे आपल्या जीवनातून पळून जातात.  म्हणून आपण नेहमी आपल्या लाडक्या ईश्वरासोबत रहावे. त्याच्या कृपाप्रसादासाठी नित्य नियमित प्रार्थना करून जे जे वाईट आहे आणि त्यावर मात करण्यासाठीचे बळ ईश्वराकडे मागितले पाहिजे असे माझे मत आहे.  प्रत्येक व्यक्तिगत मते वेगवेगळी असू शकतात कारण शेवटी व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. मला जे वाटले किंवा माझे मत आपल्या समोर मांडले.  आपण जरूर विचार करावा. अनुभूती घ्यावी.

प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे, २९१०२०१२.

गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१२

जीवन आणि शिक्षण 

नमस्कार जी,

माणसाला रोजच्या जीवनात अनेक प्रसंगाला तोंड द्यावे लागते.  अगदी सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत.  परंतु चांगल्या वाईट प्रसंगाला सामोरे जातांना, विचारपूर्वक सामोरे जाण्याची गरज आहे.  म्हणजे त्या प्रसंगातून जीवनात आनंद निर्माण करता येईल. अशावेळी विनोदबुद्धी ठेवावी. जेणे करून आपल्या मिस्कील स्वभावाचे दर्शन सर्वांना होईल.  बारीकसारीक प्रसंग असतात, काहीवेळा आपण त्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करतो, याचाच अर्थ आपण त्या आनंदाला पारखे होतो.  आपल्याला कार्यालयात जायची घाई असते. रस्त्यात डोंबा-याची लहान मुलगी अधांतरी तोल सांभाळत दोरीवरून चालत असते.  बघणारे बघत असतात. आपण एक क्षण न पाहता निघून जातो.  त्या मुलीपासून खूप काही शिकण्यासारखे आहे. तिची एकाग्रता,जिद्द, पोटासाठी कोणतेही काम न लाजता करण्याची तयारी. प्रत्येक प्रसंगातून खूप काही शिकण्यासारखे आहे, मात्र आपण काहीही शिकत नाही हे खरे ना.  आठ दहा वर्षाचा मुलगा रस्त्याच्या बाजूला चणे शेंगदाणे विकत असतो, स्वत:चे पोट भरण्यासाठी, परिस्थिती अशी असते इच्छा असूनही गरिबीमुळे त्याला शिकता येत नाही.  या त्या मुलाच्या कृतीतून आपण कष्ट कसे करावेत हे शिकू शकतो.  अशा गोष्टी पाहण्यास आपणाकडे वेळ नसतो आणि इच्छाही नसते.  आपण परमेश्वरानी दिलेल्या सद्यस्थितीत आनंद मानतो आणि शिकण्यासारखे असूनही शिकत नाही.  आपल्या अंगीही अनेक गुण आहेत.  त्या गुणांपासूनही दुस-यास खूप काही शिकता येणारे आहे.  ते गुण किंवा ते गुण आपल्या अंगी कसे जोपासले हे दुस-यांना सांगण्याची आज गरज आहे असे मला वाटते.  यासाठी वेळ काढावयाची गरज आहे असे नाही,  ज्यावेळी आपण मित्रांशी गप्पागोष्टी करीत असतो  त्यावेळी बोलतांना हे विचार दुस-यांना प्रसंगाच्या अनुरोधातून सांगितल्यास आपल्या अनुभवातून त्यांनाही शिकता येईल.  लहान लहान प्रसंगातून शिकण्याची बुद्धी मात्र हवी...

प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे, १३०९२०१२.


शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१२

येईल का दाखविता


येईल का दाखविता तुला ग...
माझ्यावरील तुझे गाढ प्रेम...
नाही येणार दाखविता तुला...
मला अनुभवावं लागेल प्रेम...

येईल का रे सुगंध दाखविता...
त्या सुंदर टवटवीत फुलांचा...
नाही येणार दाखविता तुला...
वासाने कळवा गंध फुलांचा...

येईल का ग तृप्ती दाखविता...
मनाला होणा-या आनंदाची...
नाही येणार दाखविता तुला...
अनुभूती घ्यावी त्या तृप्तीची...

प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे, ०७०९२०१२.

इंद्रधनुष्य
पावसाळ्यात अनेकदा इंद्रधनुष्य पहावयास मिळतं. एक नयन मनोहारी दृश्य. आपल्या डोळ्यात साठवून ठेवावं. इंद्रधनुष्याचे सप्त रंग आपल्या जीवनाशी निगडीत असतात. खर सांगायचं म्हणजे सुख, दु:ख, आनंद, समाधान, प्रेम, आपुलकी आणि कदाचित कोमलता इत्यादी भाव भावना त्यामध्ये असतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपले जीवन हे विविध छटांनी भरलेले आहे. त्याचा आस्वाद घेतल्यास आपणास इंद्रधनुष्यातील रंगांची प्रचिती येईल. इंद्रधनुष्यांतील मनमोहक रंग आपणास जीवनातील अनेक गोष्टी सांगून जातात. पावसाला म्हटला की, सृष्टी हिरवीगार सुंदर, काहीशी हवीहवीशी, बोचरी असल्याचे आपणास जाणवते आणि मनात सुंदर विचार येतात. कविमनाच्या कवीला सुंदर रचनाही सुचतात याच पावसाळ्यात.  माझी बहिण वर्षा चौगुले तिच्या " खास " या कवितेत म्हणते, " आपल्या भेटीतले तुझे शब्द, ते सदैव.....माझ्याबरोबर, आणि हिरवगार मन माझं, ते मात्र तुझ्याबरोबर.." दुस-या एका " तू " या कवितेत आपल्या प्रियकराला म्हणते " तू ढग त्या रिमझिम पावसाचा, तू रंग त्या दुर्मिळ इंद्रधनुष्याचा." या विश्वातील प्रत्येक व्यक्ती ही मनाने कलाकार आहे. मात्र प्रत्येक कलाकाराच्या अंगी असलेली कला या वर्षा ऋतूत फुलून बहरून येते. सर्वांना आवडणारा हा पावसाला ऋतू जीवनाला एक वेगळी कलाटणी देवूनी जातो असे म्हटल्यास चुकीचे ठरणार असे माझे मत आहे. पटतंय ना आपल्याला.


प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे, ०६०९२०१२.

गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१२

सुख दु:ख 

नकळत माझ्या दारी आले दु:ख...
विचारलं मला मी येवू का घरात...
म्हटलं ये घेऊन माझ्या सुखाला...
तरंच स्वागत होईल तुझे घरात...!!

सुखाला तुझ्याविना नाही मोल...
कळते सुखाचे मोल त्या दु:खात...
नातं सुख दु:खाचं जीवनी हवंच...
ठेऊनी घ्या सुख दु:खाला घरात...!!

प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे, ३००८२१०.

सोमवार, २७ ऑगस्ट, २०१२

कवितेची चोरी...
सुंदर कवितेची होत असते चोरी...
आवडली म्हणून करावी का चोरी...
काही मिळत नाही ना करुनी चोरी...
कशाला बर करावी कवितेची चोरी...

दरवळणा-या सुगंधाची करा चोरी...
नाही करता येणार सुगंधाची चोरी...
करू नकाचं कुकर्म नका करू चोरी...
सत्कर्मांची करा आवर्जून हो चोरी...

प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे, २५०८२०१२.



आत्मा 



घेतलंय शरीर माझ्या आत्म्यानं भाड्यानं...
घेण्या प्रायचीत्त मागील जन्मातील पापाचं...
भोगायची दु:ख नी येणारी संकटं या जन्मी...
सोडील शरीर माझं होता परिमार्जन पापाचं...

प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे...
२६.०८.२०१२


गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१२

तुझ्या शब्दांनी...

तुझ्या शब्दांनी मला दाखविली दिशा...
शब्दात न गुरफटता शब्दचं फुलवावे...
घालावी रांगोळी शब्दांचीचं कागदावर...
अगदी सहज शब्द शब्दांवर प्रेम करावे...

प्रदीप नरहरि केळकर...
सुंदर जीवन ....या फुलाप्रमाणे बहरलेले........



मैफिल 
चिमुकल्या प्रेमळ सुंदर पक्षांची...
मैफिल जमली आहे पानोठ्यावर...
करण्या साजरा आजचा शुभ दिन...
विर्जण न पडो त्यांच्या आनंदावर...

प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे, ३१०७२०१२.
 

बुधवार, २२ ऑगस्ट, २०१२

मनाची श्रीमंती

असली गरिबी ठेवावी मनाची श्रीमंती...
असता एक भाकरी उदार मनानं द्यावी...
अर्धी भाकर भुकेल्यास स्वानंदे करुनी...
रोजभाकर तुकड्याची सवय न लावावी...

प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे, २२०८२०१२.

मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१२


सुविचार...
चेहरा कितीही सुंदर असला तरीही मन सुंदर असावयास हवे. जर मन शुद्ध नसेल तर त्या सुंदर चेह-याचा काय उपयोग. म्हणून सुंदर पवित्र आणि शुद्ध मन ठेवा. ते मन स्वतःला आणि आपल्या जवळच्या मित्र परिवारास, नातेसंबंधितांना आनंदित, समाधानी ठेवेल. यातूनच ईश्वरी कृपेची अनुभती घ्या आणि ती निश्चित मिळेल याची खात्री बाळगा..

प्रदीप नरहरि केळकर...

ठाणे, ०४०८२०१२.
क्षण...
पाहू नका गेलेल्या क्षणांकडे...
येणारचं नाहीत ते क्षण परत...
वर्तमानातील क्षण जरूर पहा...
तेच करती सुख दु:खात सोबत... !!

पाहू नका भविष्यातील क्षणांकडे...

करू नका चिंता येणा-या क्षणांची...
ते क्षण आहेत जीवनातील स्नेही...
वर्तमानात होईल वाटचाल सुखाची... !!

प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे ०३०८२०१२.

प्रिती पुष्पे 
ओंजळीत माझ्या दिलीस भरभरून प्रिती पुष्पे...
तुझ्या गाढ विश्वासाची माझ्यावरील प्रितीमुळे...                                                      
माझ्या ओंजळीतील पुष्पे रहातीलचं टवटवीत...
आनंदानी हसत खेळत तुझ्या माझ्या प्रितीमुळे...

प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे,
 
वाटायचं नसतं दु:खं

वाटायचंच नसतं दु:ख व्हायचं सहभागी...
नये बसू या दु:खाला कवटाळून कोणीही...
दु:खाच्या वाटचालीत येतंय सुख मागून...
आलं सुख की आनंदानी वाटावं सर्वानाही...

वाटायचेच नसतात शब्द वाटायचे विचार...
नये बसू शब्दांनाचं पकडून कोणी कधीही...
विचार आपले मित्र देतील नक्की सोबत...
सुंदर विचारांनी होईल आपलं मन सुखीही...

प्रदीप नरहरि केळकर...
 एकच संधी 
  
 कापायचं असतं कापड घेऊनी माप...
कापण्यापूर्वी विचार करावयास हवाचं
खरंच येईल घेता माप कितीही वेळा...
कापण्या कापड मिळते संधी एकदाचं...

आपणासी बोलायचं असतं खूप काही...
बोलण्यापूर्वी विचार करावयास हवाचं...
खरंच येईल की बोलता कितीही तास...
योग्य बोलण्याची मिळते संधी एकदाचं...

प्रदीप नरहरि केळकर...