लिहू - वाचू आनंदे...
येणा-या प्रत्येक क्षणाकडे...
आपलं काही मागणं आहे...
माझी बहिण धनश्री परांजपे यांच्या आजच्या चारोळीतील शेवटच्या दोन ओळी आहेत. या दोन ओळींनी खर पाहता माझं लक्ष वेधून घेतलं. तिचं म्हणणं खर आहे असे मला वाटते कारण आपल्याला आयुष्यात येणारे जे क्षण आहेत ते क्षण सुखाचे आनंदाचे आणि समाधानाचे असावेत ही अपेक्षा आहे. कदाचित त्यातील काही क्षण हे दुखाचेही येतील. पण या क्षणांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन स्वच्छ आई न्यायिक असेल तर या क्षणांकडून आपल्याला खूप काही शिकता येण्यासारखे आहे. आपली शिकण्याची तयारी मात्र हवी. सुखाच्या - आनंदाच्या क्षणी, सुखाचे आनंदाचे क्षण अनुभवतांना त्यामध्ये आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणी, शेजारी, नातेवाईक यांना सामील करून घ्या आणि आपला आनंद द्विगुणीत करा, वाटा म्हणजेच सुखाचे आनंदाचे क्षण अनुभवल्याचे समाधान सर्वांना मिळेल. या क्षणाकडून आपल्याला हे शिकावयास मिळते की एकमेकांबद्दलच्या आपुलकी, जिव्हाळा, प्रेमातून एकत्रित व्हा. एकत्रित राहण्यात सर्वांचा फायदा आहे, कुणीही शत्रू आपल्यावर चाल करून येणार नाही. ज्यावेळी दुखाचे क्षण आपल्या आयुष्यात येतील त्यावेळीही आपल्या दुखात सर्वांना सहभागी करून घेण्याने आपले दु:ख कमी होईल. झालेले दु:ख सहन करण्याची ताकद आपल्याला मिळेल. या दुखाच्या क्षणात आपल्याला असे अनुभवास मिळते की आपण एकटे नसून सर्वजण आपल्यासोबत आहेत. यातून नक्कीच मार्ग काढता येईल. यासाठी येणा-या प्रत्येक क्षणाकडे एकच मागणे मागावे की तुझ्या सुख दु:ख, आनंद या क्षणांतून आम्हाला एकत्रित होण्याची बुद्धी दे. एकत्रित झाल्याने आमची ताकद ओळखून कुणीही शत्रू चाल करून येणार नाही. आम्हाला सुखाचे आनंदाचे आणि दुखाचे क्षण एकत्रित अनुभवत येतील. हरी ओम.
प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे, ०८०४२०१३.
येणा-या प्रत्येक क्षणाकडे...
आपलं काही मागणं आहे...
माझी बहिण धनश्री परांजपे यांच्या आजच्या चारोळीतील शेवटच्या दोन ओळी आहेत. या दोन ओळींनी खर पाहता माझं लक्ष वेधून घेतलं. तिचं म्हणणं खर आहे असे मला वाटते कारण आपल्याला आयुष्यात येणारे जे क्षण आहेत ते क्षण सुखाचे आनंदाचे आणि समाधानाचे असावेत ही अपेक्षा आहे. कदाचित त्यातील काही क्षण हे दुखाचेही येतील. पण या क्षणांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन स्वच्छ आई न्यायिक असेल तर या क्षणांकडून आपल्याला खूप काही शिकता येण्यासारखे आहे. आपली शिकण्याची तयारी मात्र हवी. सुखाच्या - आनंदाच्या क्षणी, सुखाचे आनंदाचे क्षण अनुभवतांना त्यामध्ये आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणी, शेजारी, नातेवाईक यांना सामील करून घ्या आणि आपला आनंद द्विगुणीत करा, वाटा म्हणजेच सुखाचे आनंदाचे क्षण अनुभवल्याचे समाधान सर्वांना मिळेल. या क्षणाकडून आपल्याला हे शिकावयास मिळते की एकमेकांबद्दलच्या आपुलकी, जिव्हाळा, प्रेमातून एकत्रित व्हा. एकत्रित राहण्यात सर्वांचा फायदा आहे, कुणीही शत्रू आपल्यावर चाल करून येणार नाही. ज्यावेळी दुखाचे क्षण आपल्या आयुष्यात येतील त्यावेळीही आपल्या दुखात सर्वांना सहभागी करून घेण्याने आपले दु:ख कमी होईल. झालेले दु:ख सहन करण्याची ताकद आपल्याला मिळेल. या दुखाच्या क्षणात आपल्याला असे अनुभवास मिळते की आपण एकटे नसून सर्वजण आपल्यासोबत आहेत. यातून नक्कीच मार्ग काढता येईल. यासाठी येणा-या प्रत्येक क्षणाकडे एकच मागणे मागावे की तुझ्या सुख दु:ख, आनंद या क्षणांतून आम्हाला एकत्रित होण्याची बुद्धी दे. एकत्रित झाल्याने आमची ताकद ओळखून कुणीही शत्रू चाल करून येणार नाही. आम्हाला सुखाचे आनंदाचे आणि दुखाचे क्षण एकत्रित अनुभवत येतील. हरी ओम.
प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे, ०८०४२०१३.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा