मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१२

वाटायचं नसतं दु:खं

वाटायचंच नसतं दु:ख व्हायचं सहभागी...
नये बसू या दु:खाला कवटाळून कोणीही...
दु:खाच्या वाटचालीत येतंय सुख मागून...
आलं सुख की आनंदानी वाटावं सर्वानाही...

वाटायचेच नसतात शब्द वाटायचे विचार...
नये बसू शब्दांनाचं पकडून कोणी कधीही...
विचार आपले मित्र देतील नक्की सोबत...
सुंदर विचारांनी होईल आपलं मन सुखीही...

प्रदीप नरहरि केळकर...

२ टिप्पण्या: